महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी येत्या २७ मार्चला निवडणूक पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे.
भारतीय जनता पक्षातील ३ आमदार तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा प्रत्येकी एक आमदार हे विधानसभा निवडणुकीत जिकल्या मुले विधानपरिषदेच्या जागा रिकामी झाल्या आहे.
उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाल्यामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कडून उमेदवारांच्या नावासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाकडून ३ नावे दिल्लीला पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्या मध्ये निष्ठावंतांना संधी देण्यात येणार असल्याचे बोले जात आहे. त्या मध्ये अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ असलेले माधव भंडारी याना संधी देण्यात येणार असल्याचे समजते आहे. तर आजून दादाराव केचे आणि अमरनाथ राजूरकर याना संधी देण्यात येणार आहे.

Maharashtra BJP news
Maharashtra Politics 2025

यावर आपले मत नोंदवा